गुरुवार, ११ जून, २०१५

" चार मित्रांची गोष्ट " - तिथी कि तारीख ?? ( भाग -३)




" चार मित्रांची गोष्ट "

भाग 3.

(नेहमीचीच वेळ … सारे जण गच्चीवर नेहमीसारखे जमा होणार होते , फक्त विचाराने एकमेकास शह देण्यासाठी ... आज जणू काही हिंदुस्थान आणि पाकिस्तान चा सामना असल्या सारखे वाटत होते आणि तसे पहिले तर साहजिकच प्रत्येक जण हा स्वतःला फक्त हिंदुस्थान चाच समजत होता, असो ....)
पुन्हा एकदा गच्चीवर मैफिल जमणार होती . पण केदार कुठे दिसत नव्हता .....

प्रकाश : अरे हां केदार कुठे राहिला आता ?


पुरुषोत्तम : (उन्न्मतपणे ) आज यायला घाबरला असेल , काल तर लय बोलत होता . आज शेपूट गुंडाळून लपला असेल कुठेतरी !


प्रकाश : फोन सुद्धा लागत नाही . बहुतेक विचार बदलला असेल इकडे यायचा म्हणून तर नाही ??


सुयोग : ह्म्म्म , हां यार इतक्या वेळात यायला हवं होता.. त्याने यार ...


सुयोग : खूप.. वातावरणात गर्मी वाढलीय यार .....


पुरुषोतम : बघ ६ जून पर्यंत राज्याभिषेक पर्यंत पाऊस पडणार आणि बघ कशे सगळे तिथी वाले कसे धुवून निघतात ते . हाहाहा ...


केदार : आणि जर त्या आधीच ३१ च्या तिथीला पाऊस होऊन सगळे तारीखेवाल्यांचे विचार शुद्ध झाले तर ?
( अचानक आलेल्या या आवाजाने , सर्व अश्यार्याचकीत होतात )


प्रकाश : या या केदार भाऊ ! मला तर वाटले कि आज तुम्ही काय दर्शन देत नाहीत !


पुरुषोत्तम : हाहाहा : J (मनमोकळे पण कुत्सित पणे पुरुषोत्तम हसतो )


केदार : शिवाजी राजांची शप्पथ ! आज मी एकटा च तुम्हाला पुरेसा आहे रे ! माइंड इट !!..


सुयोग : वाद घाला रे, पण जरा प्रेमाने !


प्रकाश : हां घे प्रेमाचा दिवाना ..... होहोहो 


सुयोग : गप रे पक्क्या ! विषय काय आणि तुझा चाललाय काय ?? करा मग कोण बोलणार प्रथम ?


पुरुषोत्तम : ( जसे काय फायनल जिंकल्या सारखा ) प्रथम काय प्रथम ....? शेवट च सांगतो ना, तारीखच आम्ही मानतो आणि त्या नुसारच प्रत्येक शिव कार्य करणार . फक्त एकच धुन ६ जुन ६ जुन .....


प्रकाश : (अति उस्ताहात ....) वा काय पंच मारलाय ! काय मग करायची का सुरवात ? फक्तच एकाच धून ......


सुयोग : केदार ला हि धून आवडणार नाही , नक्कीच हाहाहा


केदार : हाहाहा : बरोबर बोललास .... धून वरून लक्षात आले हि तर संभाजी ब्रिगेड ची सध्याची स्लोगन आहे. हाहाहा .... म्हणजे पुरुषोत्तम नक्कीच ब्रिगेडी कार्यकर्ता दिसतोय .


पुरुषोत्तम : अरे दिसतो नाही आहेच ! आणि प्रकाश आणि सुयोग पण सभासद होणार आहेत .


केदार : काय ??


प्रकाश : मग , लगा लगा लगा ... शॉट लगा..... हाहाहा:


केदार : (पुरुषोत्तम ला उदेशून ....) पुरुषोत्तम , अरे काय ती ब्रिगेडी विचारधारा, जातीचे राजकारण करणारी लोकं , खरंच तू जे करतोयेस ते कितपत योग्य आहे ?? आणि यानांहि भरडलेस याच्यात ...


प्रकाश : ( मैत्री पोटी केदार ने बोललेल्या बोलण्यातून सुयोग आणि प्रकाश चा अहंभाव दुखावला गेला होता )
हे बघ केदार ! तसे पहिले तर तूच चुकातोयेस .शिवरायांच्या राज्याभिषेकास खोडा घालनार्यांची जात कोनती होती ? शिवरायांना डाव्या पायाच्या अंगठ्यान तिलक करनार्यांची भामटी जात कोनती होती? आणि जाती चे राजकारण कोणाला बोलतोस ??
(प्रकाश हि गंभीर पणे उत्तरला ...)


केदार : हे चुकीची माहिती आहे .


(केदार ला विषयाचे गांभीर्य उमजले होते .)

पुरुषोत्तम : "परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत त्यामुळे ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही" असा दावा करून छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला त्यामुळे शिवरायांनी काशीहून गागाभट्टला आणून राज्याभिषेक करवून घेतला"
( पुरुषोत्तमाने हि याच विषयाला अधिक हवा देण्याचा प्रयत्न केला )


केदार : पुरुषोत्तम , तुमच्याकडे काय पुरावा आहे ? यासर्वाचा ?? गागाभट्ट यांनाच राज्याभिषेक करण्यासाठी का बोलावण्यात आले? या पाठचा खरं कारण वेगळे आहे .


पुरुषोत्तम : आहे माझ्याकडे पुरावा , आम्ही खरा इतिहास जाणतो आणि तोच स्विकारतो .


केदार : नका सांगू तुमचे इतिहासातले ज्ञान ... हाहाहा : तुमची ती अर्धवट पिवळी पुस्तके पहिलीत मी हाहाहा ....


(केदार च्या या बोलण्याने पुरुषोत्तमच्या मनात रागाचा पारा थोडा वाढलेला असतो... पण तो काही बोलणार इतक्यात मधेच सुयोग चालू होतो . )


सुयोग : हो का , मग तू सांग बर काय ते कारण .....

केदार : मग ऐक ,
पैठण येथे भट्ट घराणे नावाजलेले घराणे म्हणून ओळखले जात असे, १६ व्या शतकाच्या सुरुवातीस याच भट्ट घराण्यातील एक विद्वान गोविंदभट्ट हे काशीक्षेत्री स्थायिक झाले, तेथे त्यांच्या पिढीत गागाभट्ट यांचा जन्म झाला, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते, तसेच काशीतील त्यांच्या घराण्याची सत्ता असलेले एक विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गागाभट्टांची निवड झाली होती, यासोबतच काशीत भरवल्या जाणार्या विद्वत्तसभेत अग्रपूजेचा मानदेखील याच भट्ट घराण्याकडे होता. थोडक्यात, हे भट्ट घराणे आजच्या गांधी घराण्यासारखे अत्युच्च शिखरावर असलेले घराणे होते.
सभासद बखरीत गागाभट्ट यांचे वर्णन "कलीयुगीचा ब्रह्मदेव" असे आहे, त्यांनी "कायस्थधर्मप्रदीप" हा ग्रंथ लिहून कायस्थ हेसुद्धा क्षत्रियच आहेत याचा निर्वाळा दिला, ज्याअर्थी त्यांना "कलीयुगीचा ब्रह्मदेव" पदवी दिली गेली त्याअर्थी त्यांचे विचार हे सर्व ब्राह्मणांसाठी पूज्य आणि ग्राह्य मानले जाणे स्वाभाविक आहे. कायस्थधर्मप्रदीप मधून त्यांनी कलियुगात क्षत्रिय आहेत हे दाखवून दिले होते, तसेच 'परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली त्यामुळे ब्राह्मण व शुद्र हे दोनच वर्ण उरले' या दाव्यालादेखील सुरुंग लावला, मग अशा विद्वान व पूज्य व्यक्तीच्या मताला विरोध करून "कलियुगात क्षत्रिय उरलेच नाहीत" असा दावा करण्याची आणि तो सिद्ध करण्याची ताकद कोणत्याच ब्राह्मणात नव्हती. मग महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महाराजांना या दाव्याद्वारे विरोध केला असे कसे म्हणता येईल? अनंतदेव भट्ट हे गागाभट्ट यांचे बंधू पैठणला राहत असत, गागाभट्ट कोकणात सन १६६३ मध्ये आले होते, तेव्हा सन १६६४ च्या सुरुवातीस त्यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शेणवी जातींच्या लोकांच्या भांडणाचा निवडा राजापुरात जाहीर सभेत करून दिला, त्यानंतर सन १६६९ ते १६७२ या काळात त्यांनी कायस्थ प्रभू जातीच्या लोकांचे निवाडेही करून दिले, महाराजांना त्यांच्याबद्दल बराच आदर होता, शेणवी जातीचा निवडा महाराजांना आवडला त्यामुळे त्या निवाड्यास महाराजांनी स्वतःहून प्रशस्ती (शिवप्रशस्ती) जोडली होती.
वरील सर्व कारणे, तसेच मूळ भट्ट घराण्याची महत्ता, हाती असलेले धार्मिक अधिकार, अत्युच्च विद्वत्ता व "परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली" यासारख्या खोडसाळ दाव्यांना योग्य पुराव्यानिशी खोडून काढणे, तसेच मूळ पीठ काशी येथे या घराण्याला व खुद्द गागाभट्ट यांना असलेला मान यामुळे राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्याचा मान गागाभट्ट यांना देण्यात आला होता.
गागाभट्ट इसवी सन १६७३ ला नाशिकला आले, तेव्हा महाराजांना त्यांच्या आगमनाची वार्ता कळली, गागाभट्ट तेथून पैठणला अनंतदेव भट्ट यांच्याकडे गेले तेव्हा महाराजांनी त्यांना रायगडवर येण्याचे निमंत्रण पाठवले व येण्यासाठी पालखीची सोय केली, म्हणजे याचा अर्थ असा होतो कि गागाभट्ट हे स्वतःहून काशीतून महाराष्ट्रात आले होते, व इथे आल्यावर त्यांना महाराजांकडून बोलावणे आले होते, त्यामुळे गागाभट्ट यांना काशीतून बोलावले हे असत्य असल्याचे सिद्ध होते.
त्यानंतर गागाभट्ट सन १६७४ ला रायगडावर आले, तेव्हा त्यांना राज्याभिषेकाची कोणतीही कल्पना नव्हती मात्र भेटीत महाराजांनी त्यांना राज्याभिषेकाची कल्पना दिली, तेव्हा गागाभट्ट यांनी तिथी निश्चित केली व परत पैठणला आले, व तेथे त्यांनी राज्याभिषेकप्रयोग आणि तुलापुरुष दानविधी हे दोन ग्रंथ लिहिले व त्यानंतर राज्याभिषेकाची सिद्धता करण्यासाठी परत रायगडी आले.
जर गागाभट्ट यांना काशीमध्ये राज्याभिषेकाची बातमी कळली असती तर ते काशीहून तडक रायगडला आले असते व येतानाच दोन्ही ग्रंथ लिहून आणले असते, पण असे काही घडलेले दिसत नाही त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पैठणला येईपर्यंत राज्याभिषेकाची कल्पना नव्हती हे सिद्ध होते.


(मग ऐक ... म्हणून केदार ने सुरु केलेले बोलणे , आणि दिलेल्या दाखल्याने सर्वांचेच धाबे दणाणले ...)
(तरी पण इतक्यात हार मारणारे कोणीच नव्हते , प्रकाश ने नी जाती ला अनुसरून सूर आवळायला सुरुवात केली ..)


प्रकाश : नाही केदार , तरी पण काही ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केलाच .....
केदार : अरे बाल्या , कार्र्र असं बोलू राहिलाय ... ( काहीशी आगरी स्टाईल मारत केदार मिश्किलपणे बोलला ...)
प्रकाश : मका समजोतचss नाय बघ ! ( आगरी ला कोकणी भाषेत उत्तर प्रकाश ने दिले )
( सुयोग ला हसू आले )
सुयोग : ह्म्म्म , केदार या चा अजून काय पुरावा आहे का तुझ्याकडे ?
केदार : आहे ना ... आणि (पुरुषोत्तम कडे पाहत ..) पुराव्या शिवाय मी खोटे दाखले मांडत हि नाही आणि कोणाला ज्ञान देत नाही ...
( पुरुषोत्तम रागाने लाल बुंद झलेला असतो , पण स्वतःला सावरण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो ...)
केदार : सर्वप्रथम शिवरायांच्या क्षत्रियत्वाची माहिती घेऊ -
सन १६५६ मध्ये शिवरायांनी चंद्रराव मोर्यास लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "राजे आम्ही, आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे". यावरून दिसून येते कि महाराजांना आपण राजे आहोत अर्थातच क्षत्रिय आहोत याची जाणीव याआधीपासूनच होती, पण त्यांना हे कळले कधी व कसे हे महत्त्वाचे आहे.
स्वतः शिवराय, त्यांचे कुटुंबीय (शहाजीराजे, बंधू संभाजी व जिजाऊसाहेब) व त्यांचे आप्तस्वकीय म्हणजेच अष्टप्रधान मंडळ यांना भोसले कुटुंबीय "सिसोदिया वंशीय राजपूत क्षत्रिय" असल्याचे अगदी पूर्वीपासूनच माहिती होते, याचा पुरावा मिळतो शहाजी राजांनी विजापूर दरबारला लिहिलेल्या पत्रात, एका मुस्लिम सरदाराने शहाजी राजांना राजपूत मानण्यास नकार दिला असता राजांनी त्या पत्रातून "आम्ही तो राजपूत" (आम्ही तर राजपूत) असे विजापूर दरबाराला ठणकावून सांगितले आहे, तसेच शहाजी राजांचा राजकवी 'जयराम पिंडे' याने "राधामाधवविलासचम्पू" या ग्रंथात शहाजी राजांना "सिसोदिया अवतंस" म्हणजे सिसोदिया वंशीय म्हटले आहे, आणि शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांना त्याने "क्षत्रियगोत्री" असे विशेषण लावले आहे.
"राधामाधवविलासचम्पू" हा ग्रंथ जयरामने शिवरायांचे बंधू संभाजीराजे हे हयात असताना लिहिलेला आहे, साधारण सन १६५० अगोदर, याचा अर्थ असा होतो कि आपण शिवराय 'क्षत्रिय' कुळातले आहेत हे महाराष्ट्राला सन १६५० च्या अगोदर पासूनच माहिती होते, मग ऐन राज्याभिषेकाच्या वेळी एखादा ब्राह्मण त्यांच्या क्षत्रियत्वावर शंका कशाला आणि का घेईल?
यासंबंधी अजून एक पुरावा देता येतो, तो म्हणजे, 'कवी भूषण' याचा 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ, हा कवी भूषण सन १६६२ मध्ये स्वराज्यात आला, महाराज आग्र्याहून परत आल्यावर त्याने महाराजांच्या पराक्रमावर 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ रचण्यास सुरुवात केली, या ग्रंथात सुरुवातीलाच ४ थ्या ते १० व्या छंदात तो महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास सांगतो, तो म्हणतो,
"सर्व पृथ्वीचे भूषण म्हणून सुर्यवंश प्रसिद्ध आहे…या वंशातील एका राजाने देवाला आपले सीस (शीर) अर्पण केल्याने त्यांच्या वंशाला 'सिसोदिया' असे नाव मिळाले…याच वंशात मालमकरंद (मालोजी) नावाचा पुरुष जन्मला…तो रणावर शिलेसारखा दृढ असल्याने त्याला 'भौंसिला' हे नाव मिळाले…त्याला पृथ्वीचे भूषण असा शहाजी नावाचा पुत्र झाला…" (मूळ ब्रज भाषा, इथे मराठी भाषांतर).
हा ग्रंथ सन १६६६ मध्ये रचण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच भोसले कुटुंबाची वंशावळ सांगितली गेली आहे, म्हणजे पूर्वीचा पुरावा एखाद्याने अमान्य केला तरी या पुराव्यानुसार, शिवाजी राजे 'क्षत्रिय' कुळातले होते हे राज्याभिषेकाच्या किमान ८ वर्षे अगोदरपासून महाराष्ट्राला माहिती होते, मग तरीसुद्धा एखादा ब्राह्मण नेमका राज्याभिषेकाच्या आधी महाराजांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न निर्माण करतो असे होणे पूर्णतः अशक्य आहे. आणि म्हणूनच हे पुरावे ग्राह्य धरून आपण म्हणू शकतो कि शिवरायांच्या क्षत्रियत्वावर शंका घेण्यासाठी कोणत्याही ब्राह्मणाकडे कोणतेही कारण नव्हते, म्हणूनच महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणत्याही ब्राह्मणाने विरोध केला नाही.


सुयोग : मानले यार केदार तुला , किती सुंदर माहिती दिलीस , माझही तर पक्की खात्री झालीय आता कि नक्कीच महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणत्याही ब्राह्मणाने विरोध केला नाही.
(प्रकाश हि केदार च्या व्यक्तव्यापुढे पुरता निरुतर झाला , कारण त्याच्या कडे शिवचरित्राचा पूर्णता अभ्यास नव्हता , जे काही होते ते अर्धवट विचारांच्या लोकांच्या डोक्यातले अर्धवट विचार ...पण पुरुशोतामाने जाणून बुजून एक नवीन मुद्धा उकरून काढलाच ....)


पुरुषोत्तम : "मी आधी बाबासाहेब पुरंदरे यांचे 'राजा शिवछत्रपति' हे पुस्तक वाचून मुस्लिमद्वेषी झालो होतो, पण आता ब्रिगेडने मला सुधारले आहे". (या तो पुढे म्हणतो... कि) "ब्राह्मणांना देशात राहण्याचा अधिकार नाही."


केदार : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे खरोखर मुस्लिमद्वेषी आहेत का? तर याचे उत्तर नाही असे मी ठामपणे सांगू शकतो. कारणबाबासाहेब पुरंदरे हे आजतागायत इस्लामचा आणि मोहम्मद पैगंबरांचा आदर करत आहेत. तसे त्यांनी 'राजा शिवछत्रपति' या ग्रंथात दाखवून दिले आहे. त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी एकतर तो ग्रंथ वाचलेला नाहीये किंवा ते मुद्दाम बाबासाहेबांना ब्राह्मण म्हणून टार्गेट करत आहेत.


(प्रत्येक बोलण्याला... केदार कडे सडेतोड उत्तर होतेच ..... )

(चर्चा अशीच पुढे जोरात चालू होती ..... आणि एक एक ब्रिगेडी कुरापाती विचारांना केदार आपल्या मित्रांच्या डोक्यातून पुरता नाहीसा करत जात होता. )
पुढे वाचायला विसरू नका , या चर्चेतले अनेक मुद्धे आणि केदार चे प्रत्येक हजर जबाबी उत्तर ....जे त्याला एका उच्च स्थानी नकळत घेऊन जात होते... आणि त्याच्या मित्रांच्या मनातहि त्याच्या विषयीचा हळू हळू आदर भाव कसा निर्माण होत गेला हे वाचायला विसरू नका........ उर्वरित भाग लवकरच ! – जय शिवराय !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा