जर आपल्याला या ब्लॉग चे संचय आवडत असेल तर , तुम्ही हा ब्लॉग फोलो करू शकता , जेणेकरून यातील संचय वा माहिती आपल्याला सहज मिळत राहतील , धन्यवाद !
गुरुवार, २८ जुलै, २०१६
रविवार, २४ जुलै, २०१६
उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – उबरखिंड – खोपोली)
उंबरखिंड अभ्यास मोहीम , २०१६
कोणत्याही नवीन मोहिमेची सुरवात हि अभ्यास मोहिमेतून करणे अनिवार्य असते . याच अनुषगाने उबरखिंड मोहीम साक्षात शिवराय ज्या मार्गांनी उबरखिंडीत दाखल झाले त्याच वाटेने करण्याचे योजले होते . त्यासाठी लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली ह्या मार्गाने मोहीम सुरु केली. ठरल्याप्रमाणे दिनेश सावंत , अचल राणे , संतोष शेळके , विनोद भोसले , आणि योगेश वाळूंज असे आम्ही पाच जण या अभ्यास मोहिमे साठी प्रथमता जाणार होतो . त्यासाठी दिवस निवडला तो रविवार २४ जुलै २०१६. त्यासाठी आम्ही शनिवार , २३ जुलै २०१६ रोजी सी.ए.टी ते पंढरपूर या पेसेंजर गाडीने लोणावळा पर्यंत चा प्रवास करणार होतो. सर्व नियोजन झाले होते, बैठक पार पडली होती . परतू संध्याकाळी त्यात अचानकपणे काही कारणाने ठरलेल्या मोहीम कार्यक्रमात बदल करून आम्ही सर्व रविवारच्या सकाळी ६:३३ च्या इंद्रायणी एस्प्रेस ने निघणार होतो.
विनोद , संतोष , आणि मी (योगेश) आम्ही तिघेही अगदी वेळेवर ठरलेली गाडी पकडली. परंतु उर्वरित आमचे सख्खे दोन आधारस्तंभ म्हणजे दिनेश सावंत आणि आमच्या नेहमीच्या मोहिमेचे सरसेनापती अचल राणे यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. दोघांना फोन करून करून आमच्या मोबाईल ची बॅटरी मात्र उतरली . पण एकाने मोबाईल बंद तर दुसर्याने तो बहुधा शांत मोड वर टाकून ठेवलेला असावा . असो ... आम्ही सारे एकमेकांचे सख्खे मित्रच , आमच्या तिघांचा हि मूड अचानक पणे आलेल्या या प्रसंगाने जाम उतरला होता. इंद्रायणी गाडी सोडून दिली . परतू काही केल्या या दोघांशी तिळमात्र हि संपर्क काही होऊ शकला नाही. आता करायचे काय? असा यक्ष प्रश्न आम्हां तिघांपुढे होता. सर्व नियोजित मोहिमेचा पुरता बोजबारा उडाला होता. आम्ही सर्वांचे आगाऊ तिकीट काढून ठेवले होते ते सुद्धा व्यर्थ गेले .
काहीश्या गोंधळलेल्या आणि अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीतून स्वतःला सावरत आम्ही कल्याण स्थानकात थोडी न्याहारी केली , आणि ओळखीच्या चेहऱ्यानसोबत थोड्या हसण्याचे क्षण अनुभवले . आमच्यातल्या विनोद ने मात्र आमच्या होणाऱ्या वाहिनीशी मनमोकळ्या गप्पा मात्र मारून घेतल्या. फसलेल्या नियोजनाचे अपडेट सर्वांआधी “सबसे तेज” आमच्या वाहिनीन पर्यत पोहचत होते. या सर्वातून उरलेले आम्ही दोघे २ तास मात्र ताटकळत राहिलो ... असो !
पुढे काय करायचे ? कारण मिळणारी एक छानशी सुट्टी ची पुरती वाट लागलेली होतीच. अश्याच परिस्थितीत कार्ल्याच्या एकविरा आई , किवा भिवपुरी ला जाण्याच्या आम्ही विचार करू लागलो. सर्व काही ऑफ शेडूल होणार होते. असाच विचार करत करत आम्ही गर्दीने भरलेली आणि विकेंड ची मज्जा अनुभवण्यासाठी वा फिरण्यासाठी निघालेल्या मुंबई करांच्यासमवेत आम्ही हि कर्जत लोकल पकडली . त्याच गर्दीच्या लोकल मध्ये “दि शो मस्ट गो ओंन” या वाक्याला स्मरून उंबरखिंड ची ठरलेली मोहीमच “ऑफ शेडूल” करायची हे नक्की केले. कर्जत स्थानकातून आम्ही पुढे ९ वा. २०मि. ची इंदोर- पुणे या पूर्ण विनागर्दीच्या गाडीने प्रवास करून लोणावळा स्थानकात १०वा. ११मि. दाखल झालो.
लोणावळा स्थानकामधून बाहेर पडल्यानंतर बाहेर रिक्षा करून १५० रु . एवढा खर्च करून तिघांना कुरवंडे गावात जाता येते. चालत जायचे असेल तर किमान ४५ मिनिटे ते १ तास लागतो. आम्हांला आधीच २ तास उशीर झाल्यामुळे १०वा. ४०मि. नी रिक्षाने प्रवास चालू केला. रिक्षाने कुरवंडे गावात पोहचलो. तिथे थोडी चौकशी करून आम्ही कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागच्या बाजूने नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात केली.
सर्वजण चालण्याच्या उत्साहात होते. उजवीकडे चढत जाणारी वाट साधारण २० मिनिटे चाललो काही अंतर चालत गेल्यावर आम्हांला INS SHIVAJI च्या लांबलचक कुंपण दिसले. थोड्या पुढे गेल्यावर जेथे नागफणी चा डोंगर आहे. एकाशेजारी एक असणारे तीन बोर्ड पाहिले. इथून उजवीकडे वर जाणारा रस्ता नागफणीला जातो तर डावीकडे उतरणारा कच्चा रस्त्याने अम्बा नदीच्या काठी असलेल्या चावणी गावात जाता येते.
आम्ही चालण्यास सुरवात केली . खूप सारी नोंद घेत घेत , छायाचित्रे काढत काढत आमची मोहीम पुढे सरकत होती. झरा लागल्यानंतर मात्र एक वाट सरळ जात होती तर एक वाट उजवीकडे वळत होती. थोडा विचार करून आम्ही उजवीकडच्या वाटेवर शिक्कामोर्तब केले. सर्वांनी उजवीकडे मोर्चा वळवला. तेथून लांबवर दरीत अम्बा नदीचे पात्र दिसू लागले .
एका ठिकाणी थांबून आमच्या सोबत आणलेल्या न्याहारी चा मोकळ्या रान परिसरात आम्ही आस्वाद घेतला. खडकातून वाहणाऱ्या डोंगराळ पावसाच्या पाण्याने आमची तहान भागवत तृप्त होऊन आम्ही पुढे चालत होतो.
सोबत संतोष ने आणलेल्या वाळवलेल्या आंब्याच्या कोयींचे, जांभळाच्या बियांचे रोपण “योग्य ठिकाणी” करत होतो.
मजल दरमजल करत आणि सेल्फिं घेण्याचा मर्यादित आनंद घेत आम्ही खाली उतरत होतो. साधारणता २:०० ते २:३० तासाचे अंतर आम्ही चालुन पायथ्याशी असलेल्या चावणी गावात पोहचलो. गाव तसे अगदी साधारण आहे . किमान २०० घरांची वस्ती असलेला ते एक छोटेसे गाव होते. त्या गावातून काही कच्चा आणि मग डांबरी रस्त्यातून चालत आम्ही “उंबरखिंडीत” दाखल झालो.
समरभूमीत आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महाराजांच्या पराक्रमाला स्मरून तिथे उभारलेल्या स्मारकाला वंदन करून आम्ही दुपारचे जेवण घेतले. थोडा वेळ पोहण्याचा आनंद आम्ही त्या ओढ्या च्या ठिकाणी घेतला. वेळेचा भान ठेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. उबरखिंड ते पाली-खोपोली रोड असे ४ किलोमीटर अंतर आम्ही पायी कापले. रोडवर आल्यावर ट्रक ने आम्ही काही अंतरावरील मुख्य चौकात उतरलो तेथून पाठून आलेल्या पाली-खोपोली एस.टी. गाडीने आम्ही खोपोली गाठले .
मोहीम करताना सर्वांचा विचार, तसेच योग्य निर्णय घेण्याची असलेली नितांत गरज आणि आमच्यातील मोहीम सुरु असतानाची अबाधित एकत्र विचार शक्ती शेवटपर्यंत कायम ठेवायची असते. तिला कोणत्याही परिस्थितीत फाटे फुटू देता कामा नये. याची जाणीव करून देत , काहीश्या काळजीने आमची हि ऑफ शेडूल मोहीम मजेशीररित्या यशस्वीपणे संपन्न जाहली!
मोहीम सूत्र -
१. लोणावळा स्टेशन परिसरापासून मोहीम सुरवात
२. लोणावळा ते कुरवंडे गावापर्यंत प्रवासाचे नियोजन करावे .
३. कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठच्या बाजूपासून नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात करावी.
४. च्या कुंपणाच्या बाजूने सरळ चालत जावे.
५. चावणी गावाच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात करावी.
६. चावणी गावातून पुढे उंबरखिंडित जाता येते.
७. परतीच्या प्रवासाच्या वेळी ४ किलोमीटर अंतर चालत पार करून शेमडी गावच्या ठिकाणी, पाली – खोपोली रोड पर्यत पोहोचणे.
८. तेथून एस. टी . बस ने किवां खाजगी वाहनाने खोपोली ला जाता येते .
उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – उबरखिंड – खोपोली) च्या अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा
शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६
#श्री_शिव_छत्रपती_पुण्यतिथी
#चैत्र_शुद्ध_पौर्णिमा
डोईवरचे छत्र काढुनी,
का निराधार करुनी गेलात??
पितृत्वाचा हात काढुनी,
का अनाथ आम्हा करुनी गेलात
राजे………का आम्हास सोडूनी गेलात??
"हिंदुस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन……__/\__
ज्या स्थळी परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज समाधिस्थ झाले, ते समाधीचे स्थान जगदीश्वर देवळाच्या पूर्वेस आहे. समाधी अष्टपैलू असून चिरेबंदी आहे. समाधी उद्ध्वस्त अवस्थेत होती. कुणी लोभी दुष्टाने द्रव्यलाभाच्या आशेने तिचे धोंडे उखळलेले होते. ती दुरुस्त करण्याचे काम इ.स. १८८५ सालापासून समाधीच्या किरकोळ दुरुस्ती करितां सरकारांतून ५ रुपये मंजूर झाले होते. लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाबद्दल जनजागृती केली. श्री नानासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन सरकारशी पत्र व्यवहार केला. चार वर्षे हे स्मारक प्रकरण सरकारांत शिजून सन १९२५ साली सरकारी ठराव नं. ७०२३ ता. ६/२/१९२५ अन्वये स्मारकाचे काम पूर्ण करण्यास सरकारची संमती मिळाली.
एक सरकारी अॉफिसर व श्री. न. चिं. केळकर हे दोघे समक्ष गडावर छत्रीचा नकाशा व अंदाजपत्रक करुन गेले.अंदाजे खर्च १९००० रु. ठरवून त्याची विभागणी अशी केली. १२००० हजार रु स्मारक कमिटीने द्यावे ५००० रु. मुंबई सरकारने द्यावे व २००० रु, पुराणवस्तुसंशोधन खात्याने द्यावे. बांधकामास अॉक्टोबर १९२५ मध्ये सुरुवात झाली. पाया खोदण्याचे काम चालू असता १२ फूट खोलीवर पहार अडूं लागली. म्हणून तिथला भाग काळजीपूर्वक मोकळा करण्यात आला. तेव्हां आंत घनाकृती बांधकाम आढळले. त्याच्या दोन बाजूनी कमानी असून वर मोठी शिळा होती. शिळा उखळतांच आंत श्रीशिवरायांच्या देहाची पवित्र रक्षा अतिशय काळजीपूर्वक ठेवलेली आढळून आली. छत्री मूळच्या अष्टकोनी चौथर्यावरच उभारली असून तिच्यावर अर्धगोलाकार घुमट बसविला आहे. छत्रीच्या गाभाऱ्यांत ब्राँझ धातूचा प्रतिमाफलक पश्चिमाभिमुख बसविला आहे. छत्रीचे बांधकाम १९२७ साली संपविले.
मुळच्या अष्टकोनी चौथर्यावरच त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला आहे. चौथर्यावर जाळीदार कठडे बसविलेले आहेत. चारही बाजूला वर समाधीजवळ जाण्यासाठी वाटा ठेवल्या आहेत. या चौथर्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारलेली आहे, आठही बाजूंना आठ प्रवेशद्वार आहेत. मधल्या लहान चौथर्यावर छत्रपतींची अष्टधातूंची उठावदार उर्ध्वाकृती प्रतिमा बसविली आहे.
चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० हनुमान जयंती या विश्वातील एका बलाढ्य शक्तिच्या जन्मदिवशी विश्वातील दुसरी एक बलाढ्य शक्ति एकरुप झाली. शिवराय निजधामी गेले. श्रीजगदीश्वर मंदिराच्या समोर पूर्वदिशेस शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजे यांजकडून करविले. अष्टकोनी मुद्रा अष्टप्रधानमंडळ अष्टराज्ञी असणाऱ्या शिवरायांची स्मारक छत्री अष्टकोनी असावी हा एक सुंदर योगायोग एका शिवाचे दुसऱ्या शिवासमोर असलेले हे स्मृतिमंदिर या स्मारकाबद्दल कोणास कोणतीही शंका नसावी.
एक सरकारी अॉफिसर व श्री. न. चिं. केळकर हे दोघे समक्ष गडावर छत्रीचा नकाशा व अंदाजपत्रक करुन गेले.अंदाजे खर्च १९००० रु. ठरवून त्याची विभागणी अशी केली. १२००० हजार रु स्मारक कमिटीने द्यावे ५००० रु. मुंबई सरकारने द्यावे व २००० रु, पुराणवस्तुसंशोधन खात्याने द्यावे. बांधकामास अॉक्टोबर १९२५ मध्ये सुरुवात झाली. पाया खोदण्याचे काम चालू असता १२ फूट खोलीवर पहार अडूं लागली. म्हणून तिथला भाग काळजीपूर्वक मोकळा करण्यात आला. तेव्हां आंत घनाकृती बांधकाम आढळले. त्याच्या दोन बाजूनी कमानी असून वर मोठी शिळा होती. शिळा उखळतांच आंत श्रीशिवरायांच्या देहाची पवित्र रक्षा अतिशय काळजीपूर्वक ठेवलेली आढळून आली. छत्री मूळच्या अष्टकोनी चौथर्यावरच उभारली असून तिच्यावर अर्धगोलाकार घुमट बसविला आहे. छत्रीच्या गाभाऱ्यांत ब्राँझ धातूचा प्रतिमाफलक पश्चिमाभिमुख बसविला आहे. छत्रीचे बांधकाम १९२७ साली संपविले.
मुळच्या अष्टकोनी चौथर्यावरच त्याहून लहान दुसरा एक अष्टकोनी चौथरा बांधण्यात आला आहे. चौथर्यावर जाळीदार कठडे बसविलेले आहेत. चारही बाजूला वर समाधीजवळ जाण्यासाठी वाटा ठेवल्या आहेत. या चौथर्याच्या मध्यभागी सुबक अष्टकोनी छत्री उभारलेली आहे, आठही बाजूंना आठ प्रवेशद्वार आहेत. मधल्या लहान चौथर्यावर छत्रपतींची अष्टधातूंची उठावदार उर्ध्वाकृती प्रतिमा बसविली आहे.
चैत्र शुध्द पौर्णिमा राजाभिषेक शके ६ सातवाहन शके १६०२ ख्रिस्ताब्ध ३ एप्रिल १६८० हनुमान जयंती या विश्वातील एका बलाढ्य शक्तिच्या जन्मदिवशी विश्वातील दुसरी एक बलाढ्य शक्ति एकरुप झाली. शिवराय निजधामी गेले. श्रीजगदीश्वर मंदिराच्या समोर पूर्वदिशेस शिवरायांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार युवराज राजारामराजे यांजकडून करविले. अष्टकोनी मुद्रा अष्टप्रधानमंडळ अष्टराज्ञी असणाऱ्या शिवरायांची स्मारक छत्री अष्टकोनी असावी हा एक सुंदर योगायोग एका शिवाचे दुसऱ्या शिवासमोर असलेले हे स्मृतिमंदिर या स्मारकाबद्दल कोणास कोणतीही शंका नसावी.
संदर्भ :
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकांतून
किल्ले रायगड स्थळदर्शन
रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकांतून
किल्ले रायगड स्थळदर्शन
#प्रौढप्रताप_पुरंदर_क्षत्रियकुलावतंस_सिंहासनाधिश्वर_राजाधिराज_महाराज_श्री_श्री_श्री_श्रीमंत_छत्रपती_शिवाजी_महाराज ....
सकल त्रिलोकाचे पालनकर्ते,तारणहारराजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मीअलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापीमहाराजाधिराज,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेमहाराज हे सर्व त्रिलोकाला पोरके करून अनंतातविलीन झाले..
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजेमहाराज हे सर्व त्रिलोकाला पोरके करून अनंतातविलीन झाले..
शनिवार, ५ मार्च, २०१६
सोमवारची येणारी शिवरात्री !
महाशिवरात्र खास असण्याची ही कारणे?
- यंदाची महाशिवरात्र सोमवार दिनांक ७ मार्चला दुपारी १.२० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३३ मिनिटांपर्यंत असेल.
- यंदाची महाशिवरात्र विशेष असेल कारण यंदा भगवान शंकरांच्या सोमवारी त्रयोदशी आणि चतुर्दशी अशा दोन्ही तिथी येणार आहेत.
- याच दिवशी शुभ योग तसेच पंचग्रह, ग्रहण तसेच कालसर्प योगही येणार असल्याने ग्रहशांतीचा लाभही मिळणार आहे.
- भगवान शंकर हे तंत्राचे महादेव आहेत. म्हणून तंत्राच्या चार रात्रींपैकी एक रात्र महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यंदा मार्च महिन्यात ही रात्र महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाणार आहे.
- तंत्रांमध्ये अशा अनेक साधना असतात ज्या केवळ रात्रीच्या वेळेसच केल्या जातात. ही साधना करणे हे इतर अनेक साधना करण्यापेक्षा कित्येक पटीने लाभदायी आणि फलदायी असते.
- याच दिवशी शिवज्योती प्रकट झाली होती आणि शिव पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता.
असा योग फलदायी!
सोमवारी येणाऱ्या महाशिवरात्रीचा योग फलदायी असतो. याचे कारण चंद्र, राहू आणि केतू हे ज्यांच्यासाठी वाईट स्थानात आहेत त्यांच्यासाठी भगवान शंकरांची आराधना फलदायी असणार आहे.
भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही देऊ नका.
१. शंख - शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.
२. हळद - भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा केशरही भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.
३. तुळशी पत्र - असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.
४. नारळ पाणी - नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवा शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.
५. उकळलेले दूध - उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.
६. केवड्याचे फूल - भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.
७. कुंकू किेंवा शेंदूर - कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)











