हिंदू संस्कृती ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हिंदू संस्कृती ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ मार्च, २०१६

सोमवारची येणारी शिवरात्री !



भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे यावर्षी महाशिवरात्र सोमवारी येत आहे. महाशिवरात्री सोमवारी येण्याचा योग यापुढे पुन्हा १२ वर्षांनी येणार आहे. त्यामुळे यंदाची महाशिवरात्र शिवभक्तांसाठी खास ठरणार आहे.

महाशिवरात्र खास असण्याची ही कारणे?

- यंदाची महाशिवरात्र सोमवार दिनांक ७ मार्चला दुपारी १.२० वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३३ मिनिटांपर्यंत असेल.
- यंदाची महाशिवरात्र विशेष असेल कारण यंदा भगवान शंकरांच्या सोमवारी त्रयोदशी आणि चतुर्दशी अशा दोन्ही तिथी येणार आहेत.
- याच दिवशी शुभ योग तसेच पंचग्रह, ग्रहण तसेच कालसर्प योगही येणार असल्याने ग्रहशांतीचा लाभही मिळणार आहे.
- भगवान शंकर हे तंत्राचे महादेव आहेत. म्हणून तंत्राच्या चार रात्रींपैकी एक रात्र महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यंदा मार्च महिन्यात ही रात्र महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाणार आहे.
- तंत्रांमध्ये अशा अनेक साधना असतात ज्या केवळ रात्रीच्या वेळेसच केल्या जातात. ही साधना करणे हे इतर अनेक साधना करण्यापेक्षा कित्येक पटीने लाभदायी आणि फलदायी असते.
- याच दिवशी शिवज्योती प्रकट झाली होती आणि शिव पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता.

असा योग फलदायी!

सोमवारी येणाऱ्या महाशिवरात्रीचा योग फलदायी असतो. याचे कारण चंद्र, राहू आणि केतू हे ज्यांच्यासाठी वाईट स्थानात आहेत त्यांच्यासाठी भगवान शंकरांची आराधना फलदायी असणार आहे.

भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही देऊ नका.

१. शंख - शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.

२. हळद - भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा केशरही भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.

३. तुळशी पत्र - असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.

४. नारळ पाणी - नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवा शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.

५. उकळलेले दूध - उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.

६. केवड्याचे फूल - भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.

७. कुंकू किेंवा शेंदूर - कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे.


रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

अनंत चतुर्दशी कथा


अनंत चतुर्दशी

एके दिवशी कौण्डिन्य मुनींची नजर आपल्या पत्नीच्या उजव्या हातातील बांधलेल्या अनन्तसूत्रावर पडली , ज्याला पाहून ते काही क्षण भ्रमित झाले . आणि त्यांनी आपल्या पत्नीला विचारले – तू मलाच वश करण्यासाठी हे सूत्र हातात बांधले आहेस ना? त्यांच्या पत्नीने अतिशय विनम्रतापूर्वक उत्तर दिले नाही , हे तर अनंत देवाचे पवित्र सूत्र आहे. परंतु ऐश्वर्या” मधे मदमस्त होऊन आंधळ्या झालेल्या कौण्डिन्य मुनींने आपली पत्नीच्या सत्य गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवला नाही , तिला चुकीचे ठरवून तिन्र धारण केलेल्या  अनन्तसूत्रांना जादू-मंतरवाले आणि वशीकरण करण्याचा दोरा समजून तोडून टाकला आणि त्या धाग्याला आगीमध्ये जाळून टाकले. या घोर वाईट कर्माचा परिणाम लवकरच समोर त्यांच्या जीवनात दिसून आला.  त्यांची सारी संपत्ती नष्ट  झाली. दीन-हीन अवस्थेत ते जीवन-यापन करण्यास विवश झाले. शेवटी त्या परिस्तिथी ला कंटाळून कौण्डिन्यऋषि नी आपल्या अपराधाचे प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला. ते  अनन्त देवाकडे क्षमा मागण्याच्या हेतुने एका घनदाट नात येऊन पोहचले. त्यां घनदाट वनांत  रस्त्यामध्ये जे कोणी मिळत होते त्यांना ते अनन्तदेवाचा पत्ता विचारात होते. खूप शोधून हि  कौण्डिन्यमुनी ला जेव्हा अनन्त  देवाचा साक्षात्कार नाही झाला , तेव्हा ते खूप निराश झाले, आणि एका दगडावर बसले. आपल्या दरिद्री जीवनाला कंटाळून शेवटी आपला प्राण सोडण्यासाठी उन्मुक्त झाले. तेव्हाच एक  वृद्ध ब्राह्मण त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी त्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवले. त्यांना ते एका गुफे मधे घेऊन गेले. तिथे त्या ब्राम्हणाने त्यांना चतुर्भुजअनन्तदेवाचे दर्शन करवले.
भगवंताने मुनीनां विचारले कि तुम्ही ज्या अनन्तसूत्राचा तिरस्कार केलात, हे सर्व त्याचेच फळ आहे. त्याच्या प्रायश्चित हेतु तुम्ही चौदा वर्षांपर्यंत निरंतर अनन्त-व्रताचे पालन करावे. या व्रताचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या कडची नष्ट झालेली सम्पत्ति तुम्हांस पुन्हा प्राप्त होईल आणि तुम्ही पूर्वीप्रमाणेच  सुखी-समृद्ध होऊन जाल. कौण्डिन्यमुनिनी हि आज्ञा सहर्ष स्वीकारली. भगवंतानी पुढे सांगितले – या श्रुष्टीतला प्रत्येक जीव आपल्या पूर्ववत् दुष्कार्मांचे फळच दुर्गति च्या स्वरूपात भोगत असतात. मनुष्य जन्म-जन्मांतराच्या या पातकांच्या कारणाने अनेक कष्ट मिळवतो. अनन्त-व्रताच्या सविधि पालनातून अनेक पाप नष्ट होतात.  तथा सुख-शांति प्राप्त होते. कौण्डिन्यमुनिनी चौदा वर्षांपर्यंत अनन्त-व्रताचे  नियमपूर्वक पालन केले. आणि गमावलेली सुख समृद्धी पुन:प्राप्त केली.

#हिंदूसंस्कृती #परंपरा #टेक दुनियेतील मराठीचे शिलेदार