भाग -४
(दिवस तिसरा - गच्चीवर पुन्हा मैफिल जमली होती , पुरुषोत्तम , सुयोग, आणि प्रकाश तारीखेच्या विचाराचे आणि केदार तिथीच्या विचाराचा ... पुरुषोत्तम मनात विचार करत होता कि आज यां केदार ला धडा शिकवायचा आणि पुरता एकटा पाडायचा... पण त्याचे काही चालत मात्र नव्हते . )
केदार : तिथी नुसार जयंती साजरी करण्याचा आनंदच वेगळा असतो....तो अनुभवा, पण.. ज़रा कान, नाक, आणि डोळे सताड उघडे करूनच....कारण सत्याला नुसता मुजरा घालायचा नसतो. तर् तो आधी स्व नसानस्सा मधे भिडला गेला पाहिजे. आंधळ्या सारख्या निर्माण झालेल्या वा राजकीय लोभामुळे केलेल्या परंमपरेला महत्व देऊन आपण काय आणि कोणाचे भले करत आहोत? हे विचार करण्या सारखे आहे. कारण प्रामाणिक पणे जर जाणले तर, अंतःकरणाने नाकारल्या जाणाऱ्या अश्या गोष्टी ढोबळमानाने करून फ़क्त आणि फ़क्त आपण स्व संस्कृती आणि तिचा अनमोल इतिहास, त्यांचे महत्व, त्यातला मतितार्थ पुर्णपणे मातीमोल तर् करत नाही ना ? ? याचा सखोल विचार आत्यंतिक गरजेचा आहे. आणि त्यापुढे जाऊन हे खरंच थांबले पाहीजे, आणि त्यासाठीच सर्वोच्च प्रयत्न केलेंचि पाहिजे.
(केदार अधिक सुपष्ट पणे आपले म्हणणे मांडत होता , पण मूळ तिथी आणि तारीखे पासून चालू झालेला वाद आत्ता पूर्ण पणे त्याच्या उगमस्थानी पोहचला होता , आणि विषय “ब्रिगेडी विचार” विरुद्ध “केदारचे विचार” असा झाला होता . यात केदार हा एकटा शिवधर्म जगणारा आणि ते मानणारा होता . बाकी सर्वाना हि काही प्रमाणात का होईना ब्रिगेडी विचारांनी ग्रासले होते . )
पुरुषोत्तम: आमच्या कोकाटे साहेबांनी आम्हाला सांगितले कि औरंगजेबाने आपल्या महाराजांना 'राजा' हि पदवी सन्मानाने दिली, महाराज स्वर्गवासी झाल्यावर त्याने अल्लाकडे प्रार्थना केली होती .
केदार : तुमच्या कोकाटे साहेबांविषयी नको सांगूस , संभाजी ब्रिगेड सारखी ढोंगी द्वेषवादी संघटना दुसरी कोणतीही नसेल.
तुम्ही फक्त महाराजांविषयी अपप्रचार करून संधी साधून नेणार , तुम्हाला स्वधर्माचा अभिमान तो कुठे !
(केदार अधिक स्पष्टपणे बोलता झाला ..)
सुयोग : बर मग सांग , भगवान परशुराम हे ब्राह्मण ऋषी कुळात जन्माला आलेले थोर तपस्वी आणि त्यांनी क्षत्रियांचा संहार केला, त्यामुळे ते केवळ ब्राह्मण समाजाचेच देव व क्षत्रियांचे संहारक आहेत यांवर तुझे काय मत आहे ?
प्रकाश : हा मला काल परवा एक जण बोलत होता , परशुरामावर केले जाणारे काही प्रमुख आरोप म्हणजे:
परशुरामाने स्वतःच्या आईची हत्या केली, परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. एकदा क्षत्रिय नष्ट झाल्यावर पुन्हा कुठून आले.?, परशुराम क्षत्रिय द्वेष्टा होता., परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता, कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला.
(प्रकाश च्या मनातील एक एक आरोपाच्या फैरी तो पर्शुरामांबद्दल झाडत होता.)
पुरुषोत्तम : ह्म्म्म , खरेचं आहे हे ! स्वतः ब्राम्हण असून त्यांनी महापातक कृत्य केले आहे . ब्राह्मणांची जाताच ती , खाली मुंडी आणि पातळ धुंडी !
(नेहमी प्रमाणेच ब्रिगेडीना काय बोलावे ते सुचत नसते आणि नको ते, नको तिथे बोलून मोकळे होतात. हाहाहा J ... असो , परंतु पुरुशोतामाने मनातील राग अत्याधिक प्रखर पणे व्यक्त केला होता , त्याच्या बोलण्यातून एका सच्चा “ब्रिगेडी कार्यकर्त्या सारखा” प्रामाणिक पणे “जातीय वाद” उफाळून येत होता.)
केदार : मुळात कोकणस्थ लोकांसाठी परशुराम आणि परशुरामाची भूमी हि अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे , परंतु (सुयोग कडे पाहत ) सुयोग, ते केवळ ब्राह्मण समाजाचेच देव व क्षत्रियांचे संहारक अशी त्यांची प्रतिमा काही भेदभाव पसरविणाऱ्या दुष्ट शक्तिच वारंवार मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्दैवाने आपलेच काही बांधव... (पुरुषोत्तम कडे नजर रोखून ) या भ्रमास खरे मानून प्रत्यक्ष भगवंताच्या अवतारास जातीत बंदिस्त करू पाहतात.
(मुळात केदार पुरुशोतामाला उद्धेशून बोलला असेल हि , परंतु त्यातून हि त्याला त्याच्या डोक्यातील “मूळ ब्रिगेडी विचारांची कीड” नाहीशी करायची होती )
पुरुषोत्तम : परशुराम हा ब्राम्हण होता तरी त्याने त्याच्या आईची हत्या केली !
केदार : पुरुषोत्तम , मुळातला इतिहास त्रयस्थ पणे समजावून घेशील आणि त्यातला मतितार्थ समजावून घेशील तर तुमच्या सर्वांच्या विचारांचे शुद्धीकरण नक्कीच होईल.
पुरुषोत्तम : आम्हांला इतिहासाची पूर्ण जाणीव आहे , आणि आमच्याच लोकांनी तो जगापुढे खऱ्या रुपात आणला !
(यापुढे जाऊन तो उत्तरता झाला ) अरे सुयोग आणि प्रकाश तुम्हाला माहित हि नसेल पण शिवराय स्वतः बौद्ध धम्मीय होते.
(पुरुषोत्तम आपल्या संघटनेशी प्रामाणिक होता , पण मुळात पायाच चुकीचा असल्यामुळे त्याच्या सारख्या लाखो नवतरुण खोट्या आणि भावनिक विश्वात आपल्या “थोर इतिहासाची” कास हरवून गेले होते , केदार ला याची जाणीव होती, म्हणून अत्याधिक जबाबदारीने तो त्यांच्या विचारातील “वैचारिक बुरशीचा” सामना “शिवतेजाला स्मरून”, “एक शिवकार्य” समजून अत्याधिक प्रखरतेने करत होता.)
प्रकाश : काय ? कसा शक्य आहे हे , आता पर्यंत असे कुठे ऐकले नव्हते !
सुयोग : हो मी सुद्धा !
केदार : आजकाल शिवरायांचा इतिहास बदलण्याचे ब्रिगेडींचे प्रयत्न चालु आहेत. हाहाहाहा .... J
पुरुषोत्तम : तुम्ही लोकांनीच तो चुकीचा सादर केला, बहुजनांवर अन्याय तुमच्यातल्या ब्राम्हण लोकांनी केला . त्यांनी जे काही लिहिले ते साफ खोटे आहे . स्वतःला केद्रस्थानी ठेऊन त्यांनी अशी पुस्तके लोकांपुढे आणली . आणि आमच्या संघटनेकडून अश्या अन्यायकारक इतिहासाचे शुद्धीकरण होत असताना ते तुमच्या सारख्यांना देखवत नाही. हाहाहाहाहाहा J
(अत्याधिक कुत्सितपणे तो हसून मोकळा होतो )
केदार : भावनिक आणि नाजूक गोष्टी अत्यंत गैर प्रकारे हाताळून तुम्ही लोकं त्याचा फक्त आणि फक्तच राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करता .
प्रकाश : राजकीय फायदयाचे ते कसे रे केदार ? आणि गोरगरीब जनतेवर समाजात जे उच्च नीच पणे त्यांना वागणूक दिली जाते , त्यांच्या वर अन्याय केला जातो . मी बोललो ना, मला एक माझा मित्र भेटला होता , तेव्हा तो सांगत होता कि केवळ बहुजन असल्यामुळे त्याला त्यांच्या गावातील पुरातन हनुमानाच्या मंदिरात जाऊन दिले जात नाही . मंदिरा बाहेरूनच त्यांना दर्शन घ्यावे लागते .
( प्रथमताच या प्रश्नांच्या वेळी केदार बुचकळ्यात पडला, समाजातील या पूर्वापार चालत असलेल्या काही अनिष्ट परंपरा यातून विचारलेल्या प्रश्नांचे काय उत्तर द्यावे ?? )
पुरुषोत्तम: (अत्याधिक खुश होऊन ) एकदम रापचिक पोइंट काढलास प्रकाश ! अश्या अनेक गोष्टी आहेत . मी सुद्धा जिथे काम करायचे तिथला साहेब एक उच्च समाजाचा होता , त्यांनी हि त्याच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या बहुजन लोकांना कधीच निट वागवले नाही . कायम त्यांचा पाणउतारा करायचा !!
सुयोग : बोल केदार , काय म्हणशील यांवर ! हाहाहाहा...... J
केदार : (गंभीरपणे ) तसे पहिले तर तुम्ही मांडलेल्या या मुद्यावर मला काय बोलावे हेच कळत नाही .
सुयोग : म्हणजे तू हरलास हे तू मान्य करतोस हाहाहाहा.... J
पुरुषोत्तम : अगदी बरोबर ! होहोहोहो..... J
केदार : यात हरण्याचा प्रश्नच कुठे येतो ?? अरे या सर्व पूर्वापारपासून चालत आलेल्या काही अनिष्ट प्रवृत्ती आहेत त्या आजच्या अत्याधुनिक काळात हि तक धरून आहेत , याचे मूळ कारण म्हणजे आपल्या सारखेच काही विचारवंत आणि मूर्ख लोकं त्या परंपरा आंधळ्यासारख्या पाळत जात आहोत . यातून जर आपण स्वतःला लवकर मुक्त नाही केले तर नक्कीच आज जसा तुम्ही मला निरुत्तर करण्यासाठी याचा फायदा करून घेत आहात त्याचप्रकारे अनेक राजकारणी लोकं स्वतःचा लोभ साधण्यासाठी याला खत पाणी घालण्याचा प्रयत्न करत राहनार ....
पुरुषोत्तम : मग , तू आधी मान्य कर कि अश्या अनिष्ट आणि बहुजनांवर अन्याय करणाऱ्या गोष्टी ब्राम्हनानीच सुरु केल्या आहेत ! हाहाहाहाहा .... J
केदार : ( किंचितसा हसून ) अरे पुरुशोतामा , तुला आणि तुमच्या लोकांना जातीच्या राजकारणाशिवाय काय जमते काय रे ?? हाहाहाहाहा .... J
सुयोग : म्हणजे ?
प्रकाश : म्हणजेssss…म्हणजे ... नाकात दोन पाय असते .... हाहाहाहा .... J
(मुद्दाम सुयोग ची खेचण्यासाठी प्रकाश मधेच बोलला, केदार आणि प्रकाशला हसू आवारात नव्हते, आणि सारेच जण हसायला लागले, परंतु स्वतःला सावरत केदारने बोलायला सुरुवात केली ...... )
केदार : हे बघा , प्रत्येक गोष्टीला या दोन बाजू असतात . त्यातली एखादी चांगली आणि वाईट हि असू शकते . जर तांदूळ निवडत असताना तांदळात खडे निघाले तर तांदूळ फेकून देत नाहीत , तर त्यातले खडे वेचून दूर केले जातात . आणि निवडलेल्या तांदळाची छांन शी खीर केली जाते . आपला समाज हि तसाच आहे. आपण सर्व अनेक जाती धर्मान मधे विभागले गेलो आहोत . पण सर्वात पहिले आपण “मराठी” आहोत . शिवरायांनी “मराठी साम्राज्य” निर्माण केले आणि आपण ते जबाबदारीने ते सांभाळले पाहिजे . त्यांच्याच मुळे आपण “मराठी” म्हणून जगतो आहोत नाहीतर संपूर्ण हिंदुस्थान हां त्या काळच्या जुलमी मुस्लिम राजवटी खाली आला असता . ते म्हणतात ना – “अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी”
प्रत्येक जाती धर्मात पहिले तर , काही चुकीच्या परंपरा आहेत किवा काही अनिष्ट लोकं होऊन हि गेली, किवा आज हि ती अस्तित्वात आहेत , त्यासाठी संपूर्ण जातच किवा एक ठराविक समाज च वाईट असतो असे गृहीत धरणे कितपत योग्य आहे . हल्ली काही संघटना अश्या गोष्टींचा फायदा घेऊनच तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करतात.
आणि हे बघ प्रकाश , तू म्हणाला अश्या अनेक अनिष्ट प्रथा बंद होण्यासाठी आपल्या सारख्या सुजाण आणि सुसंस्कृत लोकांनी पुढे होऊन अश्या अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे . तुझ्या त्या मित्राला संघटीत होऊन अश्या अन्याया पाठच्या चांडाळ चौकटीचा सामना करायला हवा. गप्प बसून स्वार्थ साधणाऱ्या लोकांविरुद्ध न्यायिक मार्गाने लढा दिला पाहिजे .
प्रकाश : अगदी बरोबर बोललास बघ !
केदार : (पुरुषोत्तम कडे एक कटाक्ष टाकत ... ) आणि पुरुषोत्तम साहेब, मघाशी तुम्ही सुधा अपप्रचार करत होतात कि शिवराय हे बौध धर्मीय आहेत म्हणून ....
(केदार ला मधेच थांबवून ... पुरुषोत्तम बोलू लागतो .)
पुरुषोत्तम : आहे काय ? आणि कसला अपप्रचार ? ते खरंच आहेत , आमच्या साहेबांनी हेच सांगितले आहे आम्हांला त्य दिवशीच्या भाषणात !
केदार : मग त्यांना म्हणावा द्या मग पुरावा .... !! हाहाहाहा J
(“पुरावा” हा एकच शब्द ऐकल्यावर सगळ्या ब्रिगेडीनची बोलती पार बंद होत असते , आणि कुहाच्या कुठे हे ब्रिगेडी गायब होतात कुणास ठाऊक ?......... असो !, पुरुशोतामाचे हि असेच काही झाले होते , त्याच्या हि चेहऱ्याचा रागरंग पार उडाला होता . कारण केदार अत्यंत सुस्पष्ट आणि सर्वाचे दाखले देऊन बोलत होता . आणि ते सर्वमान्य होत होते ... )
पुरुषोत्तम : (वेळ मारून नेण्यासाठी ...) आता साध्य माझ्याकडे काही नाही ! पण हे खरे आहे .
केदार : ( मंद हास्य करत ..) तो तुमच्याकडे कधीच नसणार .... !
अरे पुरुशोतमा , शिवरायांचा जन्म शिवनेरी वर झाला. शिवनेरीवर शिवाई देवीचे मंदिर आहे. आपल्याला बलवान पुत्र व्हावा या साठी जिजाऊ माँसाहेबांनी शिवाई देवीकडे नवस केला होता. म्हणुन शिवाई देवी वरून जिजाऊ माँ साहेबांनी शिवाजींचे नामकरन केले “शिवबा” ...!!!! जिजाऊंनी त्या नवजात बाळाला स्वराज्य स्थापनेच्या कामासाठी अर्पण केले.
शिवरायांनी रायगड किल्ला उभारताना जगदिश्वराचे मंदिर उभारले. जर ते हिंदू देवतेत आस्था ठेवत नसते तर का उभारले असते मंदिर.? शिवराय बौद्ध असते तर त्यांनी भिख्खुंना राज्याभिषेकासाठी बोलावले असते, पण तसे काहीच इतिहासात नमुद नाही. शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा थाटामाटात पार पडला. शिवरायांची कुलदेवी तुळजाभवानी होती.
शिवराय उभ्या आयुष्यात फक्त तिघांच्या चरणीच नतमस्तक झाले.. माता पिता आणि भवानी माता !शहाजी राजांनी शिवरायांच्या शिक्षणासाठी काही व्यक्ती पाठविल्या होत्या. त्यांनी शिवाजींना श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, राजनिती शास्त्र ,अर्थ शास्त्र, बहुविध भाषा, सुभाषिते इत्यादी वैदिक संस्कारज्ञान दिले व धनुर्विद्या, दुर्ग दुर्गम करण्याचे ज्ञान म्हणजे दुर्गशास्त्र , दुर्गम प्रदेशांतुन निसटुन जाण्याची कला , दांडपट्टा, भालाफेक, घोडेस्वारी , अशा अनेक प्रकारे ज्ञान दिले. या शिवाय शिवाजी राजांच्या तलवारीचे नाव " तुळजा " होते व दुसरी प्रसिद्ध तलवार ही " भवानी " होती हे आपण जाणतोच.शिवरायांच्या झेंड्याचा ध्वज भगवा आहे, जो सनातन वैदिक हिंदू धर्मातला आहे. भारतातील बहुसंख्य राजपुत सहित इतरही राजे भगव्या झेंड्याखालीच राज्य चालवायचे.
“शिवाजीराजे हिंदू मराठा होते तरी त्यांनी हिंदू धर्मातील सर्व जातींना समान वागणूक दिली हे सत्य आहे, पण त्या मुळे शिवाजींनी हिंदूधर्म सोडला असे म्हणणे चुकिचे ठरेल...!”शिवरायांआधी देखील राणा प्रताप , पृथ्विराज चौहान यांनी देखील भगव्या झेंड्याखाली अस्पृश्य जातींना समान वागणूक दिलेली आढळते. भिल्ल व लोहार सारख्या जाती त्यांच्या सैन्यात होत्या. शिवरायांनी देखील महाराष्ट्रातील १८ पगड जातींना एका हिंदूसुत्रात बांधले होते.
शोध करा, शिवराय हिंदू असल्याचे अनेक पुरावे देता येतात, पण शिवराय बौद्ध असल्याचे किंवा शिवाजींनी हिंदू धर्म सोडल्याचा एकही पुरावा देता येत नाही.
सुयोग : (समर्पकपणे ....) हम्म्म्म .. !
प्रकाश : कळले का पुरुषोत्तम साहेब , उगाच काहीतरी काढतो आणि महाराजांनचा खोटा इतिहासाचा प्रचार होतो !
(सुयोग आणि प्रकाश च्या या बोलण्यातून केदार ला अतिशय समाधान लाभले , त्याच्या चेहऱ्या वरून ते साफ दिसत होते, परंतु पुरुशोतामाचे चे अजून हि समाधान होत नव्हते .... )
पुरुषोत्तम : मग त्या परशुरामाचे चे काय ??
सुयोग : अरे हा केदार , त्या बद्दल तू काहीच बोलला नाहीस ते ??
प्रकाश : आहे का याचे हि उत्तर ? ( आपुलकीने विचारत , मंद हास्य करत बोलला ....)
केदार : अरे इतिहास हा उघड्या डोळ्यांनी पहायचा असतो, आणि तो स्वताचा आहे या भावनेने जगायचा असतो .... त्या तून खूप सारे शिकण्यासारखे आहे . चुकीचा इतिहास स्वीकारलात तर सर्वस्वी हानी आपलीच होते ....
ऐका मग,.... पूर्वीच्या काळी पितृआज्ञा ही प्रमाण मानली जाई. पित्याने केलेली आज्ञा मग ती चांगली असो अथवा वाईट तिचे पालन केले जाई. हा पुरुषसत्ताक संस्कृतीचा प्रभाव असू शकतो. रामाने देखील पितृआज्ञेचे पालन केल्याचे दिसते. त्याकाळी स्त्रीची योनिशुचिता हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता. स्त्रीने परपुरुषाकडे नजर वर करून पाहू नये असा दंडक होता. मग इथे तर रेणुका भ्रमामुळे केवळ त्या गंधर्वाच्या जलक्रीडा – प्रणयाराधणेकडे आकर्षित झाली होती, मोहित झाली होती. हा फार मोठा अपराध समजला गेला. (आजही जे यावर आक्षेप घेतील त्या तथाकथित बुद्धिवंत आणि विचारवंतांनी स्वतः आपआपल्या पत्नीसह दुसऱ्या पुरुषाची जलक्रीडा प्रणय क्रीडा खुशाल पहावी व काय वाटते ते समाजाला सांगावे.) आता मृत्युदंडच का या गोष्टीवर.? तर याचे उत्तर एकाच क्रोध. समाजात विविध स्वभावाची माणसे आपल्याला नेहमी दिसतात. काही माणसे छोट्याशा गोष्टीमुळे क्रोधाविष्ट होतात तर काही माणसे कितीही मोठी गोष्ट झाली तरी त्यांना अजिबात क्रोध येत नाही. जमदग्नी ऋषींची जन्मकथा पहिली तर त्यांच्या क्रोधाचे मुल त्यांच्या जन्मकथेत आहे. त्यामुळे परशुरामाला त्यांनी रेणुकेला मृत्युदंड देण्यास सांगितले. परशुरामानी आज्ञापालन का केले, हे आधीच सांगितले आहे. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी ५ – ५० वर्षापुर्वीचा काळ आठवावा, वडिलांची आज्ञा घरातील सर्व पाळतच होते. कारण पुरुषसत्ताक पद्धती आणि पुरुष हाच घरातील कर्ताधर्ता असायचा.
आता परशुराम हे क्षत्रिय द्वेष्टा होते .... असे हि काही ब्रिगेडी सांगतात ...
भगवान परशुराम हे क्षत्रियांचे शत्रू होते, असा जो भ्रम पसरविला जातो, तो पूर्णपणे खोटा आहे. रामायणात असे उल्लेख आहेत की ज्यावरून सिद्ध होते,परशुराम हे राजा दशरथ आणि राजा जनक यांच्याकडे नेहमी जायचे.ते पण नेहमीच परशुरामाचे आदरातिथ्य करायचे आणि भगवान त्यांना आशीर्वाद ही द्यायचे. याचे स्पष्ट उदाहरण सीतास्वयंवर आहे, ज्यात अनेक राजे होते. जर भगवान परशुरामांनी सर्व क्षत्रियांना मारले असते तर हे सगळे राजे तेव्हा आनंदाने राज्य कसे करत होते.? पण प्रभू त्याच्यावर प्रसन्न होते कारण ते धर्मपूर्वक राज्य करत होते आणि प्रभू रामचन्द्रांशी भेट होईपर्यंत परशुरामांचे अवतारकार्य सुरु होते. अर्थात अधार्मिकांविरुद्ध युद्ध सुरूच होते. तरीही धर्मपूर्वक राज्य करणारे राजे तेव्हा होतेच.
(मधेच केदार ला थांबवत पुरुषोत्तम बोलू लागला .....)
पुरुषोत्तम : परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता.... तसेच कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुराम याने त्याला शाप दिला होता .
(देव असू किवा देवासमान असणारी कोणी हि व्यक्ती असू ब्रिगेडी त्यांचा एकेरी उल्लेखच करतात कारण त्यांना स्वधर्म , आणि स्वसंस्कृती विषयीचा यत्किंचित हि आदर नसतो आणि हीच लोकं दुसर्यांना इतिहासाची तोडमोड करून खोटा इतिहास माथी मारून माथी भडकवण्याचा काम आवर्जून करताना दिसतात. स्वतःच्या संघटनेचे नाव हि संभाजीराजांचा यथेच्छ अपमान करणारेच आहे .... काय म्हणावे या मूर्ख लोकांना .)
केदार : साफ खोटे आहे हे.... परशुराम हे केवळ आणि केवळ आततायी व द्युष्ट दुराचारी क्षत्रियांचा विरोधक होते. तसेच परशुराम हे समाज सुधारणा आणि जनतेला रोजगारक्षम बनविणारे नायक देखील आहे. केरळ, कच्छ, आणि कोकण क्षेत्रात परशुरामाने समुद्रात बुडालेली शेतीयोग्य जमीन शेती कसण्यासाठी पुन्हा तयार केली, आणि पशूंच्या सहाय्याने जंगलांना दूर करून जमिनीला शेती कसण्यायोग्य करवली. कार्तवीर्य अर्जुन व हैहय वंश विनाशानंतर परशुरामाने समाज सुधारणेसाठी कृषी प्रकल्पांचे कार्य केले. केरळ, कोकण, मलबार आणि कछ या ठिकाणाची अशी भूमी समुद्रातून बाहेर काढली जी कृषी साठी उपयुक्त ठरू शकते. या वेळी कश्यप ऋषी आणि इंद्र समुद्री पाण्याला बाहेर काढण्याच्या तंत्रात निपुण होते. परशुरामाने याच क्षेत्रामध्ये परशूच्या सहाय्याने रचनात्मक कार्य केले. शुद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना त्याने वने कापण्याच्या कामासाठी जुंपले आणि सुपीक जमीन तयार करून धान्याची पैदावर केली. याच शूद्रांना परशुरामाने शिक्षित व दीक्षित केले व त्यांना ब्राह्मण करवले. (वर्ण व्यवस्था जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारलेली असल्याचे सत्य उदाहरण) तसेच त्यांना यज्ञोपवीत संस्काराने जोडले आणि त्याकाळी जे दुराचारी व आचरण हीन ब्राह्मण होते त्यांना शुद्र घोषित केले, त्यांचा सामाजिक बहिष्कार केला. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी हजारो युवक युवतींचा विवाह केला. परशुरामाच्या द्वारे अक्षय तृतीयेला सामुहिक विवाह केल्या जाण्याच्या कारणाने या दिवशी विना मुहूर्त पाहता विवाह करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
परशुरामाचे अंत्योदयाचे प्रकल्प अनुकरणीय आणि अनोखे आहेत. ज्यांना रेखांकित करणे आवश्यक आहे. भगवान परशुराम यांचा काळ एवढा प्राचीन आहे कि त्याचे एकाएकी आकलन करणे अशक्य आहे.....
आणि कर्ण आणि परशुराम यांची कथा महाभारतात येते. परशुरामाने केवळ ब्राह्मण युवकाला शस्त्र विद्या देण्याची प्रतिज्ञा केली होती. (भीष्म क्षत्रियाने ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली म्हणून तो नपुंसक ठरत नाही) परंतु कर्णाने परशुरामाकडून ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून विद्या ग्रहण केली. हे जेव्हा परशुरामांना समजले तेव्हा त्याने त्याला शाप दिला.
पूर्वीच्या काळी गुरु शिष्य यांतील नाते संबंध हे पारदर्शक असत. शिष्याने गुरुपासून कोणतीही गोष्ट लपवू नये असा सामाजिक संकेत असे. आजपासून १००-१५० वर्षापर्यंतही हा संकेत व्यवस्थित पाळला जात असे. गुरु पासून शिष्याने एखादी गोष्ट लपवली तर गुरु नाराज होई, क्रोधीत होत असे आणि शिक्षा करत असत. शाळेतील जुने दिवस आठवले तर यातील अर्थ कळेल. त्यामुळे कर्ण खोटे बोलला त्याची शिक्षा म्हणून परशुरामानी त्याला शाप दिला न कि तो ब्राह्मण नसल्याने दिला. त्यामुळे हा आरोप देखील निराधार आहे.
या सर्व घटनांवरून समजते की, परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे, गरीब जनतेला साहाय्य करणारे, कृषी संस्कृती व रोजगार संस्कृती वाढवणारे, आज्ञाधारक पुत्र, अधर्म संहारक असे युगपुरुष होते.
ते बहुजनांचा आधार होते शत्रू नव्हे. अपप्रचार करणाऱ्यांनी मेंदू असल्यासारखे बोलले, वागले, लिहिले तर चांगलेच. नाहीतर जनता जनार्दन अशा नीच आणि ढोंगी, पाखंडी समाज कंटकांना त्यांचे थोबाड रंगवून त्यांची लायकी काय आहे ते दाखवल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार....
(केदार ने दिलेल्या उत्तराने पुन्हा सर्वांचे समाधान झाले असावे , कि नाही वाचा पुढील भागात – जय शिवराय !)
क्रमशः -