उंबरखिंडीच्या पतितपावन मातीच्या , येथे वाहणाऱ्या या नदीच्या स्वच्छ पाण्याच्या , थंडगार वाऱ्याच्या त्या स्पर्शाने १६६१ सालच्या त्या घडलेल्या रणसंग्रामाची प्रत्यक्ष जाणीव करून देत होते . त्या स्पर्शाने आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चतुरस्र रणनीतीची साक्षीदार असलेली उंबरखिंड याचि देही याचि डोळा पाहण्यास मिळत होती . आम्ही सर्व शिवभक्तीत पूर्णतः न्हाऊन निघालो होतो . विजयस्तंभास मानवंदना देऊन आमच्या मोहीमेची यशस्वीपणे सांगता झाली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा