रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

अनंत चतुर्दशी कथा


अनंत चतुर्दशी

एके दिवशी कौण्डिन्य मुनींची नजर आपल्या पत्नीच्या उजव्या हातातील बांधलेल्या अनन्तसूत्रावर पडली , ज्याला पाहून ते काही क्षण भ्रमित झाले . आणि त्यांनी आपल्या पत्नीला विचारले – तू मलाच वश करण्यासाठी हे सूत्र हातात बांधले आहेस ना? त्यांच्या पत्नीने अतिशय विनम्रतापूर्वक उत्तर दिले नाही , हे तर अनंत देवाचे पवित्र सूत्र आहे. परंतु ऐश्वर्या” मधे मदमस्त होऊन आंधळ्या झालेल्या कौण्डिन्य मुनींने आपली पत्नीच्या सत्य गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवला नाही , तिला चुकीचे ठरवून तिन्र धारण केलेल्या  अनन्तसूत्रांना जादू-मंतरवाले आणि वशीकरण करण्याचा दोरा समजून तोडून टाकला आणि त्या धाग्याला आगीमध्ये जाळून टाकले. या घोर वाईट कर्माचा परिणाम लवकरच समोर त्यांच्या जीवनात दिसून आला.  त्यांची सारी संपत्ती नष्ट  झाली. दीन-हीन अवस्थेत ते जीवन-यापन करण्यास विवश झाले. शेवटी त्या परिस्तिथी ला कंटाळून कौण्डिन्यऋषि नी आपल्या अपराधाचे प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला. ते  अनन्त देवाकडे क्षमा मागण्याच्या हेतुने एका घनदाट नात येऊन पोहचले. त्यां घनदाट वनांत  रस्त्यामध्ये जे कोणी मिळत होते त्यांना ते अनन्तदेवाचा पत्ता विचारात होते. खूप शोधून हि  कौण्डिन्यमुनी ला जेव्हा अनन्त  देवाचा साक्षात्कार नाही झाला , तेव्हा ते खूप निराश झाले, आणि एका दगडावर बसले. आपल्या दरिद्री जीवनाला कंटाळून शेवटी आपला प्राण सोडण्यासाठी उन्मुक्त झाले. तेव्हाच एक  वृद्ध ब्राह्मण त्या ठिकाणी आले. आणि त्यांनी त्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवले. त्यांना ते एका गुफे मधे घेऊन गेले. तिथे त्या ब्राम्हणाने त्यांना चतुर्भुजअनन्तदेवाचे दर्शन करवले.
भगवंताने मुनीनां विचारले कि तुम्ही ज्या अनन्तसूत्राचा तिरस्कार केलात, हे सर्व त्याचेच फळ आहे. त्याच्या प्रायश्चित हेतु तुम्ही चौदा वर्षांपर्यंत निरंतर अनन्त-व्रताचे पालन करावे. या व्रताचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या कडची नष्ट झालेली सम्पत्ति तुम्हांस पुन्हा प्राप्त होईल आणि तुम्ही पूर्वीप्रमाणेच  सुखी-समृद्ध होऊन जाल. कौण्डिन्यमुनिनी हि आज्ञा सहर्ष स्वीकारली. भगवंतानी पुढे सांगितले – या श्रुष्टीतला प्रत्येक जीव आपल्या पूर्ववत् दुष्कार्मांचे फळच दुर्गति च्या स्वरूपात भोगत असतात. मनुष्य जन्म-जन्मांतराच्या या पातकांच्या कारणाने अनेक कष्ट मिळवतो. अनन्त-व्रताच्या सविधि पालनातून अनेक पाप नष्ट होतात.  तथा सुख-शांति प्राप्त होते. कौण्डिन्यमुनिनी चौदा वर्षांपर्यंत अनन्त-व्रताचे  नियमपूर्वक पालन केले. आणि गमावलेली सुख समृद्धी पुन:प्राप्त केली.

#हिंदूसंस्कृती #परंपरा #टेक दुनियेतील मराठीचे शिलेदार   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा